पोस्ट्स

भगवान महावीर जयंती

 महावीर हे जैन धर्मातील 24 वे तीर्थंकर समजले जातात. तेविसावे तीर्थंकर पार्श्वनाथ होते. अडीच हजार वर्षांपूर्वी इसवी सन पूर्व 599 मध्ये वैशाली गणराज्याच्या क्षत्रिय कुंडलपुर या ठिकाणी भगवान महावीर यांचा जन्म झाला. वर्धमान यांच्या आईचे नाव त्रिशला होते. तर  वडिलांचे नाव सिद्धार्थ होते. भगवान महावीर यांचा जन्म बिहार मधील राजघराण्यात झाला होता. भगवान महावीरांना वर्धमान असे म्हटले जाते. भगवान महावीरांचे आयुष्य 72 वर्षांचे  होते . साधारणतः 30 वर्षाचे कालावधीत त्यांनी आपल्या राज वैभवाचा त्याग करून विरक्त जीवन जगले. त्यांनी संन्यास घेतला. आत्म कल्याणाचा मार्ग पत्करला. कठीण तपस्या केल्यानंतर त्यांना केवलज्ञान प्राप्त झाले.  समवशरण ज्ञान त्यांनी प्रसारित केले. पावापुरी याठिकाणी त्यांचे निर्याण झाले. भगवान महावीरांना वीरा,अतिवीरा, वर्धमान,  सन्मती नयपुत्त, कश्यप, केवल अशा विविध नावांनी ओळखले जाते.                  

डॉ.. बाबासाहेब आंबेडकर

                  दलितांचे कैवारी,भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म मध्यप्रदेशातील महू येथे 14 एप्रिल 1891 रोजी झाला . त्यांचे वडील सैन्यामध्ये सुभेदार पदावर होते .ते शिस्तीचे अतिशय भोक्ते होते. त्यांनी भीमरावांना शिस्तीचे धडे दिले.  आपल्या मुलांनी शिकावं आणि मोठं व्हावं अशी त्यांची इच्छा होती. आईचे छत्र लहानपणीच हरपले होते.       डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ नाव 'भीमराव रामजी आंबेडकर'  असे  होते. लहानपणापासूनच भिमराव अतिशय बुद्धिमान आणि महत्त्वाकांक्षी होते. जिज्ञासा वृत्ती ज्ञान पिपासू पणा यामुळे त्यांनी भविष्यात प्रचंड शिक्षण घेतले. त्याकाळच्या पुराणमतवादी समाजात राहून आपले शिक्षण त्यांनी पूर्ण केले. शालेय शिक्षण  घेत असताना त्यांना समाजातील अनिष्ट रूढी परंपरा जातीभेदाचे वाईट व कटू अनुभव आले. परंतु खचून न जाता त्यांनी आपली शैक्षणिक वाटचाल खडतर असली तरी जिद्दीने सुरू ठेवली.           बडोद्याचे संस्थानिक महाराजा सयाजीराव गायकवाड आणि कोल्हापूर...

गुढीपाडवा निबंध व माहिती

               हिंदू नववर्षाचा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा होय. चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच नव्या वर्षाचा पहिला दिवस होय. या दिवशी महाराष्ट्रात हिंदू धर्मीय लोक गुढी उभारतात. शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस असतो.            नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी घराच्या दारासमोर गुढी उभारली जाते. एका लांब बांबूच्या टोकाला रेशमी वस्त्र किंवा इतर एखादे रंगीत वस्त्र साखरेची गाठी, कडूनिंबाची पाने, चाफ्याच्या किंवा झेंडूच्या फुलांचा सुंदर हार बांधला जातो. त्यावर कलश ठेवला जातो कलशावर गंधाची पाच बोटे उमटवली जातात. गुढीची पूजा करून गुढीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात.       गुढीला विजयाचे प्रतीक समजले जाते. याच दिवशी प्रभू रामचंद्रांनी सीतेला पळवून नेणार्‍या लंकाधिपती रावणाचा वध केल्यानंतर पुष्पक विमानात बसून अयोध्या नगरी मध्ये प्रवेश केला होता. श्रीराम यांचे स्वागत करण्यासाठी अयोध्या नगरीने मोठी तयारी केली होती. सर्वत्र सडासंमार्जन करून गुढी उभारून आयोध्या नगरी सजवली होती आणि श्रीराम बंधू लक्ष्मण त्यांच्याबरोबर असल...

होळी वर मराठीत निबंध

  होळी   होळी हा हिंदूंचा फार प्राचीन काळापासूनचा सण आहे. संपूर्ण भारतभर होळीचा सण अतिशय धुमधडाक्यात साजरा केला जातो.फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला हा सण असतो.या सणाला मराठी भाषेत शिमगा किंवा होळी पौर्णिमा असेसुद्धा म्हणतात. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजेच होळी धुळवड आणि रंगपंचमी काही ठिकाणी एकत्रितरीत्या साजरी केली जातात. फाल्गुनी पौर्णिमेपासून दोन, तीन किंवा पंचमी पर्यंत म्हणजेच पाच दिवस सुद्धा होळीचा सण अतिशय मजेमजेत साजरा होतो.             एकमेकाला गुलाल लावून, रंगांची उधळण करणे, सर्वांनी एकत्र येणे,यातून बंधू भाव वाढतो आणि समाजातील विविध प्रकारची विषमता असूनही मानवतेला त्याचा फायदा होता.     गोवऱ्या, एरंड, ऊसाचे  वाढे,  केळीचे खुंट, गवत इत्यादी वस्तू वापरून  होळी तयार केली जाते. होळीमध्ये आपल्याला नको असलेल्या गोष्टी सुद्धा टाकतात. होळीमध्ये वाईट गोष्टींचे व विचारांचे  दहन करायचे असते. खोबऱ्याचे तुकडे यांची माळ होळीला अर्पण करतात.नारळ सुद्धा अर्पण करतात. मग गावातील एखाद्या आदरणीय व्यक्तीकडून तसेच महिल...