गुढीपाडवा निबंध व माहिती

               हिंदू नववर्षाचा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा होय. चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच नव्या वर्षाचा पहिला दिवस होय. या दिवशी महाराष्ट्रात हिंदू धर्मीय लोक गुढी उभारतात. शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस असतो.

           नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी घराच्या दारासमोर गुढी उभारली जाते. एका लांब बांबूच्या टोकाला रेशमी वस्त्र किंवा इतर एखादे रंगीत वस्त्र साखरेची गाठी, कडूनिंबाची पाने, चाफ्याच्या किंवा झेंडूच्या फुलांचा सुंदर हार बांधला जातो. त्यावर कलश ठेवला जातो कलशावर गंधाची पाच बोटे उमटवली जातात. गुढीची पूजा करून गुढीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात.

      गुढीला विजयाचे प्रतीक समजले जाते. याच दिवशी प्रभू रामचंद्रांनी सीतेला पळवून नेणार्‍या लंकाधिपती रावणाचा वध केल्यानंतर पुष्पक विमानात बसून अयोध्या नगरी मध्ये प्रवेश केला होता. श्रीराम यांचे स्वागत करण्यासाठी अयोध्या नगरीने मोठी तयारी केली होती. सर्वत्र सडासंमार्जन करून गुढी उभारून आयोध्या नगरी सजवली होती आणि श्रीराम बंधू लक्ष्मण त्यांच्याबरोबर असलेले त्यांचे सहकारी यांचे भव्यदिव्य स्वागत केले होते. अशी पारंपरिक समजूत आहे. असे म्हणतात की, तीच प्रथा अजूनही सुरू आहे. आजही लोक या दिवसाचे स्मरण म्हणून गुढ्या उभारतात. आनंद साजरा करतात.

            गुढीपाडवा हिंदूंच्या शुभ आणि पवित्र साडेतीन मुहुर्तांपैकी वर्षातील पहिला दिवस आहे. हा दिवस सर्वच प्रकारची कामे करण्यासाठी शुभ समजला जातो. लोक नवीन प्रकारचा व्यवसाय किंवा उपक्रमाचा शुभारंभ करतात. या दिवशी सुवर्ण खरेदी, नवीन घराचे बांधकाम, शेतीचे काही नवीन काम करण्यासाठी शुभ समजले जाते. व्यापारी लोक वही पूजन करतात. नवीन वही सुरु केली जाते.

      मोठ्या शहरांमधून हिंदू धर्मीय लोक शोभायात्रा काढतात. ही शोभायात्रा खरोखरच पाहण्यासारखी असते. महिला पुरुष अतिशय चांगल्या प्रकारची पारंपारिक वेशभूषा करून शोभायात्रेत सहभागी होतात.

      चैत्र महिना वसंत ऋतुच्या आगमनाने सुरू होतो. सर्वत्र वृक्षवल्ली ना चैत्र पालवी फुटते. निसर्गाचा चमत्कार असा की सर्वत्र पाण्याचे दुर्भिक्ष होत असतानाही नवी पालवी पहायला मिळते. ही नवी पालवी निसर्गातील सर्व प्राणी पक्षी कीटक यांना जीवनदायी ठरते. गुढीपाडवा नववर्षाचे अशारीतीने आनंददायी सुरुवात करून देतो.

      शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने मातीचे 6000 पुतळे तयार केले आणि त्यांचे सैनिकात रूपांतर केले. त्या सैनिकांचा उपयोग करून शालिवाहणा नाही शकांचा पराभव करून त्यांना देशाबाहेर पिटाळून लावले आणि या विजयाचा सुद्धा संदर्भात गुढी उभारण्यासाठी घेतला जातो .

        

        

           वैज्ञानिकदृष्ट्या बघितले तर गुढीपाडवा हा सण खूप उपयोगी आहे. कारण ह्या दिवशी कडुलिंबाचा उपयोग प्रसाद म्हणून केला जातो. गूळ आणि कडुनिंबाची पाने , फुले यांचा प्रसाद बनवता गुढीला ठेवतात आणि लोकांना वाटतात.  जर ह्या ऋतुंमध्ये जर कडुलिंबाची पाने खाल्ली तर शरीरातील उष्णता कमी होते आणि त्याचरोबर इतर रोगसुद्धा  कमी होतात. कारण आपण सर्वांना माहितीच असेल की कडुलिंब ही एक औषधी वनस्पती आहे. कडुनिंबाच्या पानांमुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढते काही लोक तर वर्षभर दररोज सकाळी कडुलिंबाची पाने भक्षण करतात इतके त्याचे फायदे आहेत.

     यानिमित्ताने आपणही हा सण अतिशय उत्साहाने, आनंदाने साजरा करून आपला आनंद द्विगुणित केला पाहिजे.


     

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भगवान महावीर जयंती

डॉ.. बाबासाहेब आंबेडकर